Talegaon : शिबिराच्या माध्यमातून कान्हे गावात विद्यार्थ्यांनी केले सामाजिक कार्य

एमपीसी न्यूज – अरिहंत कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने कान्हे (ता.मावळ) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी शिबीराचा निरोप समारंभ नुकताच पार पडला.

याप्रसंगी व्यासपीठावर गावचे सरपंच विजय सातकर, गावचे पोलीस पाटील शांताराम सातकर, साईबाबाधामचे व्यवस्थापक दत्तात्रय चांदगुडे , अध्यापक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. संदीप गाडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी रमजान वारूनकर, भूषण बिरादार, अरिहंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.लक्ष्मण शिरसागर, शितल अंकुशे, अक्षय बोरावके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

निवासी शिबीराच्या सात दिवसांमध्ये 75 विद्यार्थ्यांनी गावांमध्ये विविध प्रकारचे सामाजिक कार्य पूर्ण केले. यात गावाजवळील ओढ्यावर कोल्हापुरी बंधारा बांधणे, स्मशानभूमीची स्वच्छता करणे, प्लास्टिक कचरा मुक्ती अभियान राबवणे, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवणे, त्यांना खेळाचे मैदान तयार करून देणे, गावकऱ्यांमध्ये ‘स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून देऊन स्त्री सबलीकरणासाठी प्रयत्न करणे’ यासारखे अनेक कार्य विद्यार्थ्यांनी श्रमदानातून पार पाडले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजयजी मालपाणी, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्रजी कडू, शैक्षणिक व्यवस्थापक डॉ. भूषणजी पाटील, विभागीय व्यवस्थापक चेतनजी पारीख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुकुंदजी डोंगरे इत्यादी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.