Pune : नवले पूल अपघातातील मृतांचा आकडा वाढला

एमपीसी न्यूज : मुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळ रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. साताऱ्यावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर समोरील सात ते आठ वाहनांना धडकला. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला.

प्रशांत गोरे (वय 32, रा. उस्मानाबाद) व राजेंद्र मुरलीधर गाढवे (वय 65, रा. आंबेगाव खुर्द) आणि आणखी एकाचा या अपघातात मृत्यू झालाय. तर अपघातात आठजण जखमी असून त्यापैकी चौघेजण गंभीर जखमी आहेत. प्रेमराज राणाराम बिष्णोई (वय 25, रा. खेडजडगी, जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास बंगलोरहुन मुंबईच्या दिशेने जात असताना 22 चाकी ट्रेलरचे ब्रेक फेल झाले. त्याने एक टेम्पो, दोन दुचाकी,  एक रिक्षा, चार कार यांना धडक दिली. या अपघातामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातग्रस्त तीन वाहनांचा तर अक्षरशः चुराडा झाला आहे.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सिंहगड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय सिंहगड वाहतूक विभाग आणि अग्निशमन दलाच्या काही काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातामुळे मुंबई बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला काढले असून वाहतूक कोंडी सोडवली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.