Pune : ‘अरुण जेटली यांच्या काळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी’
खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा भाजपला घरचा आहेर
एमपीसी न्यूज – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी आलेली असून जनतेवर भरमसाठ कर लावल्याने आर्थिक मंदी जाणवू लागली आहे, अशा शब्दात माजी अर्थमंत्री आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. पुण्यात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 319 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
त्याच बरोबर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणे हे देखील 370 कलम हटवल्या इतकच महत्वाचे आहे. कलम 370 संदर्भात सरकारने माझा सल्ला घेतला होता. मात्र, आर्थिक धोरणाबाबत कुठलाही सल्ला घेतला नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. त्याच बरोबर 370 वर वारंवार वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान हे सर्कस मधील एक पात्र आहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.