Nigdi : कॉलेजमध्ये झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याची तरुणाला मारहाण; तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सहा महिन्यांपूर्वी कॉलेजमध्ये असताना तरुणीची तिच्या कॉलेजमध्ये शिकणा-या तरुणांशी भांडण झाले. त्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांच्या टोळक्याने मित्रासोबत बोलत थांबलेल्या तरुणीचा विनयभंग करत तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्री सातच्या सुमारास मरीआई माता मंदिराजवळ ओटास्किम येथे घडली.

अभिजित तांबवे, सुनील चव्हाण, अविनाश लष्करे आणि अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकतात. मागील सहा महिन्यांपूर्वी फिर्यादी तरुणीचे आरोपींसोबत भांडण झाले. शनिवारी रात्री सातच्या सुमारास तरुणी तिचा मित्र आदित्य बाविस्कर याच्यासोबत बोलत थांबली होती. तरुणीचा भाऊ देखील त्यावेळी तिथे होता. त्यावेळी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आदित्यला शिवीगाळ करून लोखंडी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली. भांडण सुरु होताच तरुणीच्या भावाने तिथून पळ काढला.

भांडण झाल्यानंतर सर्व आरोपी तरुणीच्या घरी आले. त्यांनी तरुणीला ‘भाऊ कुठे आहे सांग. नाहीतर मारून टाकीन’ अशी धमकी दिली. आरोपींनी तरुणीसोबत अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. तसेच घरातील सामानाची व रिक्षाची तोडफोड केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.