Pimpri News : मातंग समाजाच्या आरक्षण बाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी 

एमपीसी न्यूज – मातंग समाजाच्या आरक्षणाबाबत तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरनोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी महाविकासआघाडी सरकारने आपली भूमिका येत्या पाच दिवसात स्पष्ट करावी. अन्यथा मातोश्री बाहेर आत्मदहन करण्याचा इशारा  शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी दिला आहे. 
युवराज दाखले यांनी एका व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये युवराज दाखले यांनी असे म्हटले आहे की, मातंग समाजाच्या आरक्षणाबाबत तसेच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरनोत्तर भारतरत्न पुरस्कारासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करूनही सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. येत्या पाच दिवसात सरकारने आपली भूमिका स्पष्ट न केल्यास मातोश्री समोर आत्मदहन करण्याचा इशारा दाखले यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.