Talegaon : पराभव दिसू लागल्याने भाजपच्या पायाखालची वाळू सरकली – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – भाजपला पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांना सत्तेच्या माध्यमातून त्रास देणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरू केले आहेत, असा आरोप मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दादागिरीला मतदारांनी चोख उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शेळके यांनी जोशी वाडा परिसरात कोपरासभा घेऊन निवडणूक प्रचाराची सांगता केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे, मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, तळेगाव शहराध्यक्ष गणेश काकडे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, सुलोचनाताई आवारे तसेच किशोर आवारे, हेमलता काळोखे, अॅड. रुपालीताई दाभाडे, विजय काळोखे, रोहित लांघे, अनिता पवार आदी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

शेळके म्हणाले की, मावळच्या आणि तळेगावच्या जनतेने दिले तितके प्रेम कोणालाच मिळाले नाही. निवडणूक ही विचारांची लढाई लढायची असते, परंतु यांनी माझ्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांना त्रास देणे, सत्तेचा वापर करून नोटीस पाठवणे, त्यांना धमकावणे, यासारखे उद्योग त्यांनी चालू केले आहेत. पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी सर्वसामान्य तरुणांना व महिला-भगिनींना त्रास देणे चालू केले आहे

गणेश खांडगे, किशोरभाऊ आवारे, बाप्पूअण्णा भेगडे, गणेश काकडे यांनी माझ्यावर सख्ख्या भावसारखे प्रेम केले. दोन पावले मागे येत मावळच्या विकासासाठी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि प्रचारात देखील त्यांनी खूप मेहनत घेतली. आतापर्यंत माझ्यावर विश्वास दाखवला तसाच विश्वास अजून दोन दिवस दाखवावा आणि भरभरून मतांचे दान पदरात टाकावे, असे आवाहन सुनील शेळके यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.