Pune : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री होणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला आहे. त्याला फडणवीस जबाबदार असल्याचा सूर व्यक्त होत आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे अशी भाजपातील दिग्गज नेतेमंडळी नाराज आहेत. फडणवीस दिल्लीत गेल्यानंतर या वरिष्ठ नेते मंडळींना मोठी संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे. मात्र, असा दावाच चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेत पत्रकरांशी बोलताना फेटाळून लावला.

राज्यात शिवसेना – भाजपची युती तुटल्यानंतर काँगेस – राष्ट्रवादी – शिवसेना महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकार विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.