PuneNews : हे सरकार त्यांच्याच वजनाने पडेल : गिरीश बापट

एमपीसी न्यूज : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आम्हाला पाडण्यात आम्हाला रस नाही. त्यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्याच वजनामुळे पडेल, असा विश्वास पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला. 

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीचे आज मतदान होत आहे. खासदार गिरीश बापट यांनी पुणे पदवीधर निवडणुकीचे मतदान कुटुंबीयसह केले. त्यानंतर प्रसार माध्यमाशी ते बोलत होते. तसेच यावेळी अनेक घडामोडीवर भाष्य देखील केले.

बापट पुढे म्हणाले की, राज्यातील महाआघाडी सरकार करोना महामारी हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून महापूर, अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वार्‍यावर सोडले. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष पाहण्यास मिळत आहे. तसेच महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे हे सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही. हे त्यांच्याच वजनाने पडेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात निवडणुकीत गेल्या वर्षभरात महा विकास आघाडी सरकारने सर्व सामान्य नागरिकाचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे. या गोष्टीचा फायदा भाजप मित्र पक्षाला होणार असून आमचे उमेदवार निवडून येतील, या निवडणूकीच्या निकालामधून महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्व आणि राज्य सरकार बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, अशा शब्दात महा विकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.