CM Uddhav Thackrey : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हंटले, कि उद्धव ठाकरे यांनी किती जणांच्या चुली पेटवल्या? तुम्ही चुली पेटवणारे नाही, तर चुली उद्धस्त करण्याचे काम केले आहे. तुम्ही मराठी तरुणांच्या हाती दगड दिले.  तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते, असेही नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह यांना ठार मारल्याचा आरोप केला, तसेच त्यांनी जया जाधव आणि रमेश मोरे यांना का मारलं? असा सवाल उपस्थित केला. 

काय म्हणाले नारायण राणे???

मी जवळपास 39 वर्ष शिवसेनेत होतो. कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवणारे एकमेव नेतृत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आता राज्याचे मुख्यमंत्री काय आणि कुठल्या भाषेत बोलू शकतात? याचा अंदाज राज्यातील जनतेला आला आहे. कोण चूल पेटवत? तुम्ही अडीच वर्षात किती लोकांच्या चुली पेटवल्या? किती लोकांना नोकऱ्या दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या असंस्कृत भाषणाला उत्तर देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे.

Iqbal Singh Chahal : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ पुस्तकाचे प्रकाशन

हिंदुत्व टोपीत नाही डोक्यात असावे लागते

पुढे ते म्हणाले, कि उद्धव ठाकरे यांनी 14 तारखेला फार मोठा गवगवा करून जाहीर सभा घेतली. हि सभा शक्ती प्रदर्शन घेण्यासाठी घेतली, पण सभा किती भरली आणि त्याला खर्च किती आला असेल याचा अंदाज नागरिकांना आला. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली यामुळे त्यांना मुख्यमंत्री (CM Uddhav Thackrey) म्हणण्याची लाज वाटायला पाहिजे. आतापर्यंत असंख्य मुख्यमंत्री झाले, त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे भाषण ऐकून वाईट वाटलं. हे अपेक्षित नव्हतं. असे नारायण राणे यांनी वक्तव्य केले. हिंदुत्व टोपीत नाही, डोक्यात असाव लागते. 2019 हे साल तुमच्या डोक्यातून गेले का?

कोणी संशय घेतला होता?

देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलताना नारायण राणे म्हणाले, कि तुम्ही (CM Uddhav Thackrey) फडणवीस यांच्या वजनाबद्दल बोलता; तुमचा चेहरा आरशात पहा. तुमच्या मनात राम आहे का रावण? राम हि नाही रावणही नाही.  शिवसैनिकांनो तुम्हाला शिवसेनेन अडीज वर्ष काय दिले? लाखांची सभा तुमच्या नशिबात नाही. आता बाहेर पडा; ते दिवस गेले आता. यांना मर्द म्हणून सांगावे लागते; यांच्यावर कोणी संशय घेतला होता? असा घणघणाती प्रहार केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.