Unlock 4.0 : काय बदलणार, शाळा महाविद्यालये सुरू होणार?

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला त्यानंतर हळूहळू निर्बंध शिथिल करत व देशात अनलाॅक’ची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार देशात सध्या अनलॉक 3.0 सुरू असून विविध आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत. दोन दिवसानंतर देशात 4.0 ची प्रक्रिया सुरू होणार असून नवीन नियमावलीनुसार कोण कोणत्या गोष्टींना शिथीलता दिली जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. 

गृहमंत्र्यांच्या मार्फत जाहीर केल्या जाणाऱ्या अनलॉक 4.0 च्या नियमावलीत 1 सप्टेंबरपासून शाळा, लोकल सेवा आणि ट्रेन सेवा सुरु करणार का याची सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. शाळांचे व महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे मात्र आगामी पहिल्या सत्राच्या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाणार हा प्रश्नही सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

शाळा महाविद्यालये सुरू करण्याबाबत केंद्र सरकार अजून तरी विचार करत नसून ऑनलाइन पद्धतीनेच काही दिवस क्लास सुरु राहू शकतात. दरम्यान, अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या होणारच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून याबाबत विद्यापीठ तयारी करत आहेत.

अनलॉक 4.0 मध्ये काय बदल होऊ शकतात ?

कोविड-19 नियमाचं पालन करणं, जसं की मास्क न घालणं, सोशल डिस्टन्सिंग आणि परिसरात थुंकणं किंवा कचरा टाकल्यास मोठा दंड आकारला जाऊ शकतो.

शाळा आणि महाविद्यालयं बंद राहतील, तर बारच्या काऊंटरवर दारु मिळू शकते.

चित्रपटगृह देखील बंद राहतील कारण 25 ते 30 टक्के क्षमता असलेले शो चालवणं शक्य नाही.

कर्नाटक सरकारने म्हटलं आहे की, विविध पदवी अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचं शैक्षणिक वर्ष 1 सप्टेंबरपासून ऑनलाईन वर्गाद्वारे सुरु होणार, तर ऑफलाईन वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरु होऊ शकतात.

कर्नाटक हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी चित्रपटगृह आणि रेस्टॉरंटमध्ये दारुच्या विक्रीला परवानगी मिळू शकते.

मुंबईमध्ये लोकल ट्रेन अनलॉक 4.0 मध्ये पुन्हा सुरु होण्याची शक्यता कमीच आहे. वैध कारणाशिवाय बाहेर पडल्यास तर वाहनं रोखली जातील, असा इशारा मुंबई पोलिसांनी वाहनचालकांनाही दिला आहे

अनलॉक 4.0 मध्ये, कोविड-19 हॉटस्पॉटमधून देशांतर्गत विमानांना कोलकातामध्ये उतरण्याची परवानगी दिली जाईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “आमच्याकडे सहा कोविड-19 हॉटस्पॉट राज्यांमधून उड्डाणं पुन्हा सुरु करण्याची विनंती करण्यात आली होती. 1 सप्टेंबरपासून सहा राज्यांमधून (दिल्ली, मुंबई, पुणे, नागपुर, चेन्नई आणि अहमदाबाद) विमान सेवा आठवड्यातून तीन वेळा पुन्हा सुरु होऊ शकते.

केंद्र सरकार दिल्लीतील मेट्रो सेवा पुन्हा सुरु करण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे. 22 मार्चपासून दिल्ली आणि एनसीआरमध्ये मेट्रो सेवा बंद आहे. इथे टिकटिंग सिस्टम लागू केली जाऊ शकते आणि आता टोकनचा वापर करण्याची परवानगी नसेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.