Vadgaon Maval: मावळ तालुक्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा – देवा गायकवाड

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात सर्वच भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी तालुक्यातील युवा नेते देवा गायकवाड यांनी केली आहे.

या संदर्भात देवा गायकवाड यांनी मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांना निवेदन दिले. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पंचनामे न करता, तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी निवेदनात केली. मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ या तिन्ही भागांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीक हातातून गेले आहे. पंचनाम्यांची औपचारिकता पूर्ण करण्यात वेळ घालविण्याऐवजी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.