Wakad crime News : लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा छळ

ही घटना डिसेंबर 2018 पासून 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली.

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान केला नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊन छळ केला. ही घटना डिसेंबर 2018 पासून 21 फेब्रुवारी 2020 या कालावधीत घडली.

अक्षय विलास कांबळे (वय 35), अलका विलास कांबळे (वय 55), विलास संतराम कांबळे, सचिन विलास कांबळे (वय 40, सर्व रा. थेरगाव, वाकड), स्वाती दत्तात्रय कांबळे (वय 42, रा. नागेटणे, पनवेल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी तिच्या लग्नात सासरच्या लोकांच्या मनाप्रमाणे मानपान केला नाही, या कारणावरून सासरच्या लोकांनी तिला त्रास दिला.

तसेच विवाहितेच्या माहेरच्या लोकांची परिस्थिती गरीब असल्याने आरोपींनी त्यांना धमकावून, शिवीगाळ करून मारहाण केली. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.