Wakad : आर्थिक व्यवहारातून एकाचे अपहरण करत मारहाण

एमपीसी न्यूज – आर्थिक व्यवहारातून टोळक्याने एकाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.9) उत्कर्ष चौक वाकड (Wakad) येथे घडली.

याप्रकरणी बालाजी भिमराव तिडके (वय 44, रा.धानोरी) यांनी फिर्याद दिली असून विलास तात्याराम कारगुडे (वय 21), सिद्धेश्वर धर्मराज खोसे (वय 28), माऊली नामदेव बालटकर (वय26), विवेक सुनिल डोंगरे (वय 23) हे सर्व बीडचे राहणार असून तेजस सुर्यकांत काळे (वय 21, रा. अहमदनगर), अशोक हनुमंत टेकाडे (वय.23 रा.बालेवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यातील अमोल कल्याण पवार (वय 25 रा.बीड) हा फारार झाला आहे.

Indrayani River : इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे (Wakad) आरोपींचे 5 लाख 50 हजार रुपये देणे बाकी आहे. याच आर्थिक व्यवहारातून आरोपींनी फिर्यादिला एम.एच.42 के. 8469 या क्रमांकाच्या स्कॉर्पिओमधून जिवे मारण्याच्या हेतून अपहरण केले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव हाणून पाडला. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.