Wakad : पूर्ववैमनस्यातून तिघांना मारहाण; दहा जणांवर गुन्हा
एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दहा जणांच्या टोळक्याने तिघांना मारहाण केली. तसेच महिलेवर दगडफेक केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री दहाच्या सुमारास स्मशानभूमी रोड काळेवाडी येथे घडली.
गट्टू उर्फ अक्षय सरतापे, शंकर परदेशी, अशोक खेडकर अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी आरती दयाराम परदेशी (वय 52, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निलेश डावरी, सागर पाटील आणि अन्य आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी तलवार, कोयते, दांडके, दगड घेऊन आले. आरोपी सागर याने सरतापे यांच्या पाठीवर व उजव्या हातावर कोयत्याने मारून जखमी केले. अन्य आरोपींनी शंकर आणि अशोक यांना बांबूने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींच्या तावडीतून पळून जात असताना आरोपी डावरी याने तलवार फेकून मारली. आरोपींनी फिर्यादी परदेशी यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यांच्या दुचाकीची तोडफोड केली. ‘कोणी मध्ये आले तर त्यांना आम्ही सोडणार नाही’ अशी धमकी देऊन दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.