Nigdi News : स्वउन्नतीसाठी प्रभावमुक्त व प्रकाशयुक्त जीवन महत्वाचे – स्वामी श्रीकंठानंदजी

एमपीसी न्यूज – आज प्रत्येकाचे जीवन हे बाहेरील परिस्थितीच्या प्रभावातून जगतानाचे चित्र आपण पाहतो. मनोरंजन करणाऱ्यांना जीवनाचे आदर्श मानू लागलो आणि आपले जीवन अंधारमय होऊ लागले.  आपण प्रत्येकाने  स्वत:लाच प्रश्न विचारला पाहिजे की, (Nigdi News) खऱ्या अर्थाने ज्ञानाचा प्रकाशाचा उपयोग आपल्याला कसा होईल व आपण प्रकाशयुक्त होऊ, असे प्रतिपादन स्वामी श्रीकंठानंदनी यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळा अंतर्गत संस्कृती संवर्धन व विकास महासंघ तसेच महिला भजनी महासंघाच्या वर्धापन दिनानिमित्त , ‘यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

अनेक उदाहरणांचे दाखले देत, भारतीय संस्कृती प्रत्येक गोष्टीत, कशी स्वयंप्रकाशीत करते याचे विवेचन केले. त्यासाठी त्यांनी संतांची, ऋषींची व भारतीय मंत्रांची उदाहरणे दिली. आपण या प्रकाशात वाटचाल केली तर आपल्या जीवनातही उत्कर्ष होईल याबद्दल खात्री दिली. प्रश्नोत्तराच्या वेळेत विद्यार्थ्यांनी स्वामीजीशी संवाद साधला व त्याला स्वामीजींनी समर्पक व समाधानकारक उत्तरे दिली. विवेकानंदांच्या उत्तीष्ठ, जागृत भारताचे उदाहरण दिले, अशा उदाहरणांमुळे विद्यार्थी अत्यंत प्रभावीत झालेले दिसून आले.

Pimpri News :  राज्यात “माता रमाई जयंती उत्सव” साजरा होण्याकरिता आदेश निर्गमित करण्याची मागणी

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक पवन शर्मा,  पुष्पराज वाघ यांचे सहकार्य लाभले. संस्कृति संवर्धन व महासंघाचे अध्यक्ष हभप किसन महाराज चौधरी यांनी प्रास्ताविक केले.

शिवानंद चौगुले, चंद्रशेखर जोशी, विकास देशपांडे, रमेश टेकाडे, गिरीश देशमुख तसेच स्वा.सावरकर मंडळाचे, राजीव देशपांडे, राजेंद्र त्रंबके, भास्कर रिकामे, व पतंजली योग (Nigdi News) समितीचे संतोष देशपांडे, प्रिया देशपांडे, विजया माने आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.  प्रा. पुष्कराज वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तर, उज्वलाताई केळकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.