जमिनीच्या वाटपावरून पाच जणांकडून शेतकऱ्याला बेदम मारहाण
एमपीसी न्यूज – जमिनीच्या सरस निरस वाटपावरून पाच जणांकडून शेतकऱ्याला डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मरकळ येथे गुरुवारी (दि.17) घडला.
याप्रकरणी किशोर अशोक लोखंडे (वय 35 रा.मरकळ) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गणेश कुंडलीक लोखंडे, कुंडलीक ज्ञानोबा लोखंडे, दोन महिला आरोपी व शंकर कुंडलीक लोखंडे सर्व राहणार मरकळ यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्या जमिनीच्या सरस-निरस वाटपावरून वाद होते. याच वादातून आरोपींनी फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर टाकत, हाताच्या करंगळीवर कोयत्याने वार केला.तसेच लाथाबुक्क्यांनी मारून फिर्यादी यांना जखमी करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.