Pimpri : अपहरणकर्त्यांनीच अपहृत तरुणाला पोलीस ठाण्यात आणले

एमपीसी न्यूज –  पिंपरी गावातून एका तरुणाचे चार जणांनी अपहरण (Pimpri ) केले. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करत अपहरणकर्त्यांनीच पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

सागर सुरेशकुमार यादव (वय 24) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेश कुमार यादव यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश राजेंद्र जगताप (वय 39, रा. पिंपरी), राहुल तुकाराम जगताप (वय 50, रा. चिंचवड), अमित तुकाराम जगताप (वय 48, रा. चिंचवड), विजय चंद्रकांत माने (वय 39, रा. पिंपरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Bhosri : पूर्ववैमानस्यातून तरुणास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपरी गाव येथे वडापावची गाडी आहे. तिथून आरोपींनी फिर्यादी यांचा मुलगा सागर याचे अपहरण केले. आरोपींनी सागरला त्यांच्या कारमध्ये बसवून त्यास मारहाण केली. त्यानंतर सागर याला आरोपींनी पिंपळे सौदागर परिसरात नेले. तिथे पुन्हा मारहाण करून आरोपींनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठले. ज्यांनी अपहरण केले त्यांनीच अपहरण झालेल्या तरुणाला पोलिसांसमोर हजर केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र नमके प्रकरण काय आहे याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करीत (Pimpri ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.