Alandi News : 2047 पर्यंत पूर्ण भारत विकसित करण्याचा नरेंद्र मोदींचा संकल्प -संजय निर्मल
एमपीसी न्यूज – काल (दि. 4) अशोका हॉटेल मध्ये भाजपच्या (Alandi News) वतीने अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश बैठक भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जाती मोर्चाचे संजय निर्मल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव,धर्मेंद्र सोनकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनी आळंदी मधील झोपडपट्टीच्या वस्ती मध्ये जात तेथील नागरिकांशी संवाद साधला.आळंदी मधील पत्रकार परिषदेत संजय निर्मल म्हणाले, पंतप्रधानाच्या विविध योजना ह्या सर्वांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. त्या योजनां पासून कोणीही वंचीत राहता कामा नये.येथील विरोधी पक्ष (राष्ट्रवादी,काँग्रेस)सत्तेत असताना त्या योजना थांबवण्यासाठी कार्य केले.
आळंदी मध्ये पंतप्रधान आवास योजना,घरकुल योजना का थांबल्या आहेत, या प्रश्नाविषयी उत्तर देताना ते म्हणाले, पालिकेकडून पूर्ण माहिती घेऊन पुढील त्या संदर्भातील काम पूर्ण केले जाईल.तसेच विविध योजना माहिती होण्यासाठी येथे नागरिकांसाठी कॅम्प घेतले जातील.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत पूर्ण भारत विकसित करण्याचा संकल्प केला आहे.
पक्ष संघटन व येथील कार्यकर्त्यांचा संपर्क होण्यासाठी येथे आपण आलो असल्याचे, ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी माऊलीं मंदिरास सदिच्छा भेट देऊन संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी चे दर्शन घेतले.