Pimpri : भाटनगर येथे चार दुचाकी जळून खाक (व्हिडिओ)
एमपीसी न्यूज – पिंपरी मधील भाटनगर येथे चार दुचाकी जळून खाक झाल्या. ही घटना आज (मंगळवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास पत्राशेड येथे घडली. अग्निशमन विभागाने तात्काळ आग विझवली असून या आगीमध्ये दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तानाजी रामचंद्र पवार, मधुकर तुरुक मारे, सागर परमेश्वर कांबळे, राहुल तांबे, बीबी शेख यांच्या दुचाकींचे नुकसान झाले आहे.
अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भाटनगर मधील पत्राशेड येथे चार दुचाकींना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलास मिळाली. त्यानुसार संत तुकाराम नगर येथील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. दुचाकींना लागलेली आग तात्काळ विझवण्यात आली. मात्र आग नियंत्रणात येईपर्यंत दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ही कामगिरी मुख्य अग्निशमन दल पिंपरीचे फायरमन अशोक कानडे, शंकर पाटील, भूषण येवले, मयुर कुंभार व वाहन चालक प्रवीण लांडगे यांच्या पथकाने केली.