Pimpri : आळंदी घाटावरचं जगणं घेऊन येतोय ‘घाट’ चित्रपट

एमपीसी न्यूज – ज्ञानोबा माऊलीच्या आळंदी घाटावर जिथे लोक जीवनाचा मोक्ष मिळवण्यास येतात अशाच पवित्र घाटावर उपेक्षितांचं आयुष्य जगणा-या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी म्हणजे ‘घाट’ हा चित्रपट. नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक मान्यवरांच्या उपस्थितीत दाखवण्यात आली. आळंदी घाटाच्या पार्श्वभूमीवर दोन मित्रांची फुललेली कहाणी दाखवतानाच जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड चित्रपटात मांडण्यात आली आहे.

चित्रपटादरम्यान आमचे छान सूर जुळले होते असं सांगताना त्याची झलक चित्रपटातही दिसेल असा विश्वास दिग्दर्शक राज गोरडे व चित्रपटातील कलाकारांनी व्यक्त केला. मन्या व पप्या यांच्या नात्याचा हळवा बंध उलगडून दाखवतानाच तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणा-या कुटुंबांच्या जगण्यातील दाहक वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. कथेच्या मागणीनुसार या चित्रपटात ज्ञानोबा माउलींचा एक गजर असून हा गजर वैभव देशमुख यांनी लिहिला आहे. प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा यांनी तो स्वरबद्ध केला आहे.

निर्मिती – सचिन जरे
दिग्दर्शन – राज गोरडे
प्रस्तुती – जरे एंटरटेन्मेंट
कार्यकारी निर्माते – विठ्ठल गोरडे
कथा- पटकथा- संवाद – राज गोरडे
कलादिग्दर्शक – प्रकाश बल्लाळ
छायांकन – अमोल गोळे
संगीत – रोहित नागभिडे
कलाकार – यश कुलकर्णी, दत्तात्रय धर्मे या दोन लहान मुलांसोबत मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी आदींनी प्रमुख भूमिका बजावल्या आहेत
साऊंड डिझाइनिंग – महावीर साबन्नवार
संकलन – सागर वंजारी
रंगभूषा आणि केशभूषा – रसिका रावडे
कॅास्च्युम डिझाइन – शीतल पावसकर केले आहेत
निर्मिती व्यवस्थापक – विनायक पाटील
‘घाट’ चित्रपट 15 डिसेंबर, 2017 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.