सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे आवश्यक- अवदेश मल्लया

देश पातळीवरील सुरक्षा अधिकार्‍यांचे लोणावळ्यात प्रशिक्षण शिबिर
एमपीसी न्यूज- कामगारांचे आयुष्य कामाच्या स्थळी सुरक्षित होण्यासाठी कंपनीमधील सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे नितांत गरजेची असल्याचे मत भारतीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संघटना (ओशिया) चे अध्यक्ष अवदेश मल्लया यांनी व्यक्त केले.

औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांचे आरोग्य कामाच्या ठिकाणी कसे सुरक्षित करता येईल याबाबत देश पातळीवरील विविध कंपन्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात सुरु आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अवदेश मल्लयां यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भारतीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संघटना देश पातळीवर विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून समाजाला सुरक्षे संदर्भात प्रशिक्षण व माहिती देण्याचे काम करत आहे. मुख्य प्रशिक्षक डाँ. मनजित सिंग म्हणाले, भारतामध्ये सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र असे करणे हे धोकादायक आहे. कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी मोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक केली जाते. मात्र बहुधां ते प्रशिक्षित नसल्याने कामगारांच्या सुरक्षेला बाधा निर्माण होते. याकरिता या सुरक्षा अधिकार्‍यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम ओशिया संस्थेने हाती घेतला आहे.

लहानपणापासून सुरक्षेची भावना प्रत्येकांच्या मनात रुजण्यासाठी ओशिया संस्था शाळा, मह‍विद्यालये, संस्थामध्ये जाऊन हे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. अपघात घडणे हे आपल्या हातात नसले तरी अपघात आपण टाळू शकतो, याकरिता दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबतचे प्रशिक्षण या शिबिरांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
कौटुंबिक सुरक्षितता याविषयावर प्रथम सत्रात डॉ. विलास जोशी यांनी उपस्थित‍ांना मार्गदर्शन केले. डाँ. मनजिंत सिंग, कंपनीचे सरचिटणीस सुनील भालेराव, भारत लांडे व संपदा गायखे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सुरक्षा अधिकार्‍यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य व सुरक्षा याविषयासह अपघात कसे रोखावेत यावर प्रशिक्षण दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.