Loksabha Election : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा : बी. जी. कोळसे पाटील यांचे आव्हान

एमपीसी न्यूज – “गेल्या‌ दहा वर्षात‌ देशाची सत्ता‌ चालवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने मोठ्या प्रमाणात घोटाळे केले आहे. आतापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यातील मतदानातून मोदी‌ सरकार जाणार”, हे‌ स्पष्ट झाले आहे. मात्र, “झोला लेके निकलूंगा” असे म्हणणाऱ्या मोदींनी जाण्यापूर्वी ३०० लाख कोटींच्या घोटाळ्याचा( Loksabha Election) हिशोब द्यावा, असे आव्हान उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिले. 

पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी( Loksabha Election) उपस्थित होते.

कोळसे पाटील म्हणाले, “संविधान सर्वश्रेष्ठ असून सर्वोच्च न्यायालय, संसदनंतर आहे. निवडणूक आयोग, न्यायमूर्ती यांच्या नियुक्तींची प्रक्रिया बदलली. मोदी  शहांना प्रत्येक संस्थेवर ताबा मिळवायचा आहे. या दोघांनी कायदे पायदळी तुडवण्याचे काम केले”. निवडणूक रोख्यांचा जगात सर्वात मोठा घोटाळा असल्याचे निर्मला सीतारामन यांचे पती म्हणत आहेत. मूलभूत हक्काची पायमल्ली होत असेल तर न्यायालय स्वतःहून कडक शासन करण्याचा आदेश करते. मात्र, देशात मूलभूत हक्काची पायमल्ली होत असताना गेल्या दहा वर्षात एकदाही सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो अॅक्शन घेतली नाही. कायद्याचे दात काढण्याचे काम मोदी शहांनी केले आहे.

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यानंतर मोदी सत्तेतून जाणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यात त्यांचा पराभव दिसत आहे. झोला घेवून जाता येणार नाही, त्यापूर्वी त्यांनी केलेल्या 300 लाख कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब द्यावा लागेल. त्यानंतर त्यांनी कुठे जायचे तिकडे जावे,असेही कोळसे पाटील म्हणाले.

मोदींसारखा खोटं बोलणारा नेता यापूर्वी कधीही देशाने पाहिला नाही. नोटाबंदीनंतर काळा पैसा देशात आला का ? खोटं बोलून लाचारांची‌ फौज पुढे बसवून हसायला लावणारे मोदी आहेत. धमकी देवून धंदा व चंदा‌ गोळा केला. दहा‌ ते बारा लाख‌ लोक‌ देश सोडून परदेशात स्थायिक झाले.  मोदी आणि शहा यांच्या काळात देशात बेकारी वाढलेली आहे. राहुल गांधी बुद्धांच्या‌ वाटेने चालत असून त्यांना देशाची‌ चिंता आहे. वसंतदादा व इतर लोक कमी शिकलेले होते, तरीही त्यांनी संसद गाजवली. तशाच प्रकारे रविंद्र धंगेकर संसद गाजवतील,असा विश्वास कोळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Pune : पुण्याला सुखी शहर बनवूया – रवींद्र धंगेकर 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.