Maharashtra : तलाठी भरती परीक्षेतील तांत्रिक अडथळा प्रकरणी ‘टीसीएस’ला कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज – तांत्रिक बिघाडामुळे तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षेला (Maharashtra ) सोमवारी दोन तास विलंब झाला. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडली. नियोजित वेळेपेक्षा विलंब झाल्याने परीक्षा घेणाऱ्या ‘टीसीएस’ कंपनीला भूमी अभिलेख विभागाकडून कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. तसेच तलाठी भरतीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून, परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली नसल्याची स्पष्टोक्ती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.

Mahavitran : राज्यात दहा महिन्यात विद्युत वाहनांसाठी विजेच्या विक्रीत तीप्पट वाढ

तलाठी भरतीसाठी यंदा 10 लाख 40 हजार 713 एवढे अर्ज छाननीअंती प्राप्त झाले आहेत. सोमवारी सकाळचे पहिले सत्र 9 ते 11 या वेळेत होणार होते. मात्र, टीसीएस कंपनीच्या डाटा सेंटर सव्‍‌र्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन तासांच्या विलंबानंतर हे सत्र सुरू झाले. टीसीएस कंपनी आणि त्यांचे डाटा सेंटर यांनी देशभरातील परीक्षांबाबत हा तांत्रिक बिघाड झाल्याचे भूमी अभिलेख विभागाला कळविले.

त्यानंतर तातडीने प्रत्येक जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रथम सत्रातील परीक्षा विलंबाने सुरू होणार असल्याचे कळविण्यात आले. त्यानुसार सर्व परीक्षा केंद्रांवरील उमेदवारांना स्थानिक प्रशासनाकडून सूचना देण्यात आली होती.

दरम्यान, टीसीएस कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करून राज्यातील सर्व 115 केंद्रांवर सकाळी 11 वाजता परीक्षा सुरू करण्यात आली. पहिल्या सत्राला विलंब झाल्याने साहजिकच त्यानंतरच्या दोन्ही सत्रांनाही दोन तास विलंब झाला.

या परिक्षेला जरी हा बिघाड झाला असला तरी  पुढील सत्रातील सर्व परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अप्पर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक आनंद रायते यांनी केले (Maharashtra ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.