Pavana Dam: सहा महिन्याचा पाणी प्रश्न मिटला; धरणात 50 टक्के पाणीसाठा

 एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात पावसाची धुंवाधांर बॅटिंग सुरु आहे. सात दिवसात धरणात 49.48 टक्के पाणीसाठा झाला आहे. (Pavana Dam) त्यामुळे पुढील सहा महिन्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पाणलोट क्षेत्रात 1 जूनपासून 1 हजार 52 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

 

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांना पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत-पुनावळे दरम्यान असलेल्या बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. (Pavana Dam) निगडी, प्राधिकरणातील सेक्‍टर 23 येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पाणी पुरवठा केला जातो. यंदा उन्हाळा तीव्र होता. उष्णतेची लाट, पाण्याचा वापर वाढल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले. त्यातच यंदा जून महिन्यात पावसाने मोठी ओढ दिली.

 

त्यामुळे महापालिकेने दैनंदिन पाणीवापर अत्यंत काटकसरीने करावा. दैनंदिन पाणीवापर असाच सुरु राहिल्यास आणि पाऊस लांबणीवर गेल्यास तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी महापालिकेने मोठ्या प्रमाणात पाणी कपात करावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाने महापालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महापालिकेनेही आणखी पाणी कपात करण्याचे नियोजन सुरू केले होते. मात्र, धरण परिसरात 1 जुलैपासून पावसाला चांगली सुरूवात झाली. त्यामुळे अडीच वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या शहरवासीयांची जास्तीची पाणीकपात टळली.

 

1 जुलैपासून धरण परिसरात पावसाला चांगली सुरूवात झाली. त्यानंतर धरण परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरणातील येवा वाढला. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. आज रात्रीपर्यंत धरणात  49.48 पाणीसाठा झाला. त्यामुळे पुढील सहा महिन्याचा पाणी प्रश्न मिटला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.