चित्रपट ‘पाटील’ विचारांचा त्रिवेणी संगम

(दीनानाथ घारपुरे) 

आपण आपले करिअर करण्याचा विचार करतो त्यावेळी सकारात्मक विचारांचा मागोवा घ्यावा लागतो, तसेच घरादाराचा विचार करावा लागतो, प्रेम मिळविण्यासाठी किंवा करिअर घडविण्यासाठी महत्वाकांक्षा – जिद्द ह्याची गरज असते, अश्या महत्वपूर्ण कल्पनेवर स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा ली, सचिकेत प्रोडक्शन, शौभम सिनेव्हिजन प्रा ली निर्मित आणि बॉलीवूड टुरिझम, ए.व्ही.के.एन्टरटेनमेंट प्रस्तुत “ पाटील “ हा सिनेमा सादर केला आहे.

ह्याचे निर्माते तेजल केतन शाह, नीता लाड, जय मिजगर, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे, रुपेश टाक. हे आहेत, कथा-पटकथा-दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे आहे. छायाचित्रण सुधाकर रेड्डी यकांती / राजा,, यांनी केले आहे. संवाद एस आर एम मिजगर यांनी लिहिले असून गीते गुरु ठाकूर, समीर पांडा जाफर, संजय वारंग, एस आर एम यांची असून संगीत आनंद मिलिंद, सोनाली उदय, प्रभाकर नरवाडे, डी एच हारमोनी, एम आर एस एलियन यांनी दिले आहे, या मध्ये शिवाजी लोटन पाटील, संतोष राममीना मिजगर, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, सुरेश पिल्ले, कपिल गुडसूरकर, प्रतिमा देशपांडे, अभिलाषा पाटील, वर्षा दांडले, असे अनेक कलाकार आहेत.

शिवाजी पाटील हे एका सरकारी कार्यालयात नोकरी करीत असतात, त्यांचा मित्र भीमा वाघमारे हा तेथेच मोठया पदावर असतो, दोघांची बालपणापासून मैत्री, शिवा पाटील चा मुलगा कृष्णा ह्याला इंजिनिअर व्हायचे असते, पण मार्क कमी पडतात त्यामुळे त्याला सरकारी कॉलेज मध्ये प्रवेश मिळत नाही भीमा वाघमारे यांच्या मदतीने त्याला देणगी देऊन खाजगी कॉलेज मध्ये प्रवेश मिळतो, तेथे पुष्पा वाघमारे ची ओळख होते दोघांचे प्रेम जमते पण ते पुष्पा चा भाऊ सम्राट ह्याला आवडत नाही, कृष्णा आणि सम्राट ह्यांच्यात वादावादी होते, कृष्णा गावाला निघून जातो, वडिलांचे स्वप्न त्याला पूर्ण करायचे असते, त्यासाठी तो नेमके काय करतो ? त्याला मदत कोण करते ? पुष्पा चे पुढे काय ? कृष्णा आणि पुष्पा चे प्रेम सफल होते का ? सम्राट चे पुढे काय होते ? अश्या अनेक भावनिक प्रश्नाची उत्तरे सिनेमात मिळतील..

प्रेम हे आंधळे असते, प्रेम कधीच श्रीमंत-गरीब असा भेदभाव करीत नाही. अनेक भेदभावाच्या सीमारेषा ओलांडून प्रेमाचे खरे अस्तित्व निर्माण होते. तारुण्यात प्रेम जमते त्यात गुंतून राहिलो तर आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण कसे करणार ? आई-वडिलानी मुलासाठी मोठे होण्याची स्वप्ने पाहिलेली असतात, तसे झाले नाही तर दोन मनाच्या विचाराचे सामाजिक युद्ध सुरु होईल, आपण आईवडिलांचे स्वप्न – आपले तारुण्य सुलभ प्रेम आणि करिअर पूर्ण करण्यासाठी आपण मनांत आदर-प्रेम-आणि जिद्द याचा एकत्रित विचार केला तर सर्व साध्य होऊ शकते.

संतोष राममीना मिजगर यांनी चित्रपट बंदिस्तपणे दिग्दर्शित केला असून पटकथा ने तो गतिमान ठेवला आहे, त्याच बरोबर त्यांनी शिवाजी पाटील हि महत्वपूर्ण भूमिका ताकदीने रंगवली आहे. नरेंद्र देशमुख यांनी कृष्णा ची भूमिका, भाग्याशी मोटे हिने पुष्पा ची भूमिका, सुरेश पिल्ले यांनी भीमा वाघमारे ची भूमिका मनापासून सादर केल्या आहेत. या शिवाय शिवाजी लोटण पाटील, कपिल गुडसूरकर, वर्षा दांडले, ह्यांच्या सुद्धा भूमिका लक्षांत राहतात. सुधाकर रेड्डी यकांती / राजा यांचे छायाचित्रण छान असून निलेश गावंड मनीष शिर्के याचं संकलन असून त्यांनी चित्रपट गतिमान ठेवला आहे. त्याचप्रमाणे संगीत सुमधुर आहे.

माणसाने आपल्या आयुष्यात आपले करिअर निवडताना आई-वडिलांची सेवा करीत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याची मानसिकता अंगीकारली पाहिजेत, त्यांचे आशीर्वाद मिळून यशाचा मार्ग सुद्धा सापडतो असा संदेश सिनेमा देतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.