Ahmadnagar : मुलीची छेड काढणं जीवावर बेतलं ; जमावाकडून आरोपीची हत्या

एमपीसी न्यूज -अहमदनगर जिल्यात एक धक्कादायक (Ahmadnagar )घटना घडली आहे. चार महिलांच्या हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्त झालेल्या व्यक्तीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे . अण्णा वैद्य अस जमावाच्या हल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव आहे. अकोले तालुक्यातील सुगाव गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

सुगावमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढण्याच्या (Ahmadnagar )कारणावरून संतप्त झालेल्या जमावाने अण्णा वैद्य यांच्या घरावर हल्ला केला . छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असतांनाच जमाव आक्रमक झाला.

Ind-SaT-20 :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

जमावाच्या ह्या हल्यात अण्णा वैद्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी संगमनेर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. जमावाच्या हल्यात मृत्यू झालेल्या अण्णांवर २०११ साली चार महिलांच्या हत्येचा आरोप होता . याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. या जमावाच्या घटनेनं एकाच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.