Pune : रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार रंगकर्मी लकी गुप्ता यांना प्रदान

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी स्थापन केलेले (Pune) रूपवेध प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा यावर्षीचा तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार आज डॉ लागू यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत रंगकर्मी लकी गुप्ता यांना राजीव नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नाईक बोलत होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह संकुल याठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. रोख रुपये 75 हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

Pune : मशिदीमधील कर्मचाऱ्याकडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस पी कुलकर्णी, श्रीमती दीपा लागू, डॉ आनंद लागू, राजेश देशमुख, शुभांगी दामले, सेंटरचे सभासद व अनेक कलाकार यावेळी आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू कुटुंबीय यांच्या पुढाकाराने नव्याने उभारण्यात येत असलेल्या श्रीराम लागू रंग अवकाशाबद्दल आणि भारतीय रंगभूमीविषयी राजीव नाईक यांचे भाषणही संपन्न झाले.

लकी गुप्ता यांनी ‘थिएटर ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून भारतभर भ्रमण करून आठशेहून अधिक ठिकाणी विविध एकल नाटके सादर केली आहेत. त्यांनी सादर केलेल्या नाटकांची प्रयोगसंख्या काही हजारांच्या घरात आहे. ‘माँ, मुझे टागोर बना दे’ या नाटकाचा 1 हजार 306 वा प्रयोग त्यांनी यावेळी कार्यक्रमानंतर सादर केला.

लोकशाहीवादी रंगभूमीबद्दल आपले https://www.youtube.com/watch?v=wyeYXm9aKYgविचार मांडताना राजीव नाईक म्हणाले, “या रंगभूमीवर द्वेष न करता समोरच्याचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. प्रेक्षकांना जसा टीका करण्याचा हक्क आहे तशी त्यांच्यावर अभ्यास करण्याची जबाबदारी आहे याचे भान ही रंगभूमी देईल. आशाया सोबतच रुपाची मोकळीक येथे महत्त्वाची ठरेल. टीका करताना समोरच्यामध्ये जे काही सर्वोत्तम आहे ते आत्मसात करायची तयारी या ठिकाणी असेल.”

लोकशाहीवादी रंगभूमी ही केवळ बहुसंख्यांकांची रंगभूमी असता कामा नये. लोकशाहीवादी समाजाप्रमाणेच यामध्ये देखील वेगळा विचार करणाऱ्या अल्पसंख्यांकांना स्थान असायला हवे, मान असायला हवा आणि त्यांचा तो मान इतरांनीही राखायला हवा. रूप आणि आशय या दोहोंना यामध्ये योग्य स्थान असावे.

या रंगभूमीवर तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याचा आणि विरोध दर्शविण्याचा ही अधिकार हवा. लोकशाहीमध्ये, नाटकामध्ये विरोध करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, फक्त तो संविधानाला धरून असायला हवा. जर तो संविधानात बसत असेल तर तो लोकशाहीवादी ठरतो. जर एखादी विचारसारणी मान्य नसेल तरी ते विचार ऐकून घेण्याची तयारी हवी, याकडे नाईक यांनी लक्ष वेधले.

या रंगभूमीवर गांधीवादी, सावरकरवादी, मार्क्सवादी सर्वांना आपले विचार मांडता येतील आणि प्रेक्षकांनाही ते ऐकून आपली मते ठरविता येतील. कोणतीही भूमिका घेताना इतरांच्या भूमिकांचा देखील येथे आदर होईल. सादरीकरणावर टीका- विवेचन हे व्हायलाच हवे, असेही नाईक म्हणाले.

या पुरस्काराने पुढे जाण्याची प्रेरणा दिली असे यावेळी लकी गुप्ता यांनी सांगितले. डॉ मोहन आगाशे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर राजेश देशमुख यांनी आभार मानले. गौरी लागू यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ आनंद लागू यांनी कार्यक्रमाची संकल्पना सांगत मनोगत व्यक्त केले. शुभांगी दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (Pune) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.