Alandi : पाण्यात उभे राहून राष्ट्रगीत गात वेधले इंद्रायणी प्रदूषणाकडे लक्ष

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि (Alandi)जागृती व दिलासा संस्था यांच्या वतीने प्रदूषित इंद्रायणी नदीमध्ये तोंडाला काळया पट्ट्या बांधून, अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. इंद्रायणी नदीत उतरून राष्ट्रगीत गात आंदोलकांनी प्रशासनाचे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले.

यावेळी शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, संस्थाध्यक्ष विकास कुचेकर, सचिव रवी भेंकी, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, शहराध्यक्षा मीना करंजावणे, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अॅड अनंत काळे, गजानन धाराशिवकर, पंडित वनस्कर, शामराव सरकाळे, काळूराम लांडगे, बबन मगर, बाळासाहेब साळुंके, प्रकाश वीर, पाडूरंग नाडे, दशरथ कांबळे, तुकाराम इंगळे, बाबासाहेब पवार, नितीन गंगावणे, विनायक चव्हाण, अक्षय साळुंके, पोलीस निरीक्षक बी एम जोंधळे, उमेश ढोणे, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

इंद्रायणी नदीमध्ये ठिकठिकाणी (Alandi)नाल्यांमधील पाणी प्रक्रियेशिवाय सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी दिवसेंदिवस अधिक प्रदूषित होत आहे. कार्तिकी एकादशी, संजीवन समाधी सोहळ्यासाठी पुढील काही दिवसात लाखो वारकरी भाविक अलंकापुरी आळंदी मध्ये येणार आहेत. या प्रदूषित इंद्रायणीमुळे या वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पिंपरी-चिंचवड महापालिका, आळंदी नगरपरिषद प्रशासनाला जाग आणण्यासाठी मंगळवारी (दि. 21) तोंडाला काळ्या पट्टया बांधून हातात पोस्टर घेत अर्धनग्न होऊन इंद्रायणीच्या पाण्यात उतरून मूक आंदोलन करण्यात आले असल्याचे आण्णा जोगदंड यांनी सांगितले. रसायनयुक्त पाणी सोडणा-यांवर आस्थापना, व्यावसायिक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून आस्थापनांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी देखील जोगदंड यांनी केली.

Alandi : एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून स्वायत्ततेचा दर्जा प्राप्त

दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले, “भाविकांच्या भावनेशी खेळण्याचे पाप आस्थापना व शासकीय यंत्रणा करत आहेत. हेच प्रदूषित पाणी पवित्र तीर्थ म्हणून भाविक पितात. जर ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. शिवाय सर्व साहित्यिक एकत्र येऊन पाण्यात उतरून कविसंमेलन घेऊ असा ईशारा देखील त्यांनी दिला.

रवी भेंकी म्हणाले, “जाता येता इंद्रायणी नदी फेसाळलेली व काळवंडलेली बघून मनाला खूप वेदना होतात. काळजाचा ठोका चुकतो. प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष अॅड अनंत काळे म्हणाले, आम्ही अनेक वेळा आंदोलने केली पण तात्पुरती मलमपट्टी होते. नंतर जैसे थै असे होते. यामुळे प्रशासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही.

मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहर अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले, कार्तिकी यात्रे पर्यत ठोस उपाययोजना न केल्यास यापुढे अशीच परिस्थिती राहिली तर आम्ही हरित लवादामध्ये याचिका दाखल करून न्याय मागू.

नदी प्रदूषण कमी रोखण्याची शपथ जोगदंड यांनी दिली. इंद्रायणीच्या पात्रात उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत गात आंदोलनाची सांगता झाली. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.