Kondhwa : चारित्र्याच्या संशयातून दोन मुलांसह आईचा खून करून जाळले; चुलत दिराचे संतापजनक कृत्य

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोंढवा परिसरात (Kondhwa) चुलत दिरानेच चारित्र्याच्या संशयातून दोन लहान मुलासह त्यांच्या आईचा खून केला आणि नंतर त्याचे मृतदेह जाळले. कोंढव्यातील पिसोळी परिसरात बुधवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आम्रपाली वाघमारे (वय 25), रोशनी (वय 6) आणि आदित्य (वय 4) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. आरोपी वैभव रूपसेन वाघमारे (वय 30) याला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. समीर साहेबराव मासाळ (वय 34) यांनी या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी रूप सेन आणि मयत आम्रपाली हे लातूर तालुक्यातील औसा येथील रहिवासी आहेत. आम्रपाली ही विवाहित असतानाही ती वैभव याच्यासोबत काही महिन्यांपूर्वी पुण्यात आली होती. पिसोळी परिसरात ते  भाड्याच्या खोलीत राहत होते. दरम्यान आम्रपाली हिच्या चारित्र्यावर आरोपी संशय घ्यायचा. यातून त्यांच्यात भांडण व्हायचे.

बुधवारी रात्री देखील त्यांच्यात याच कारणावरून वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने आम्रपाली हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर रडत असणाऱ्या घरातील लहान मुलांचा देखील त्याने गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर तिघांचेही मृतदेह घरासमोर असणाऱ्या एका पत्राच्या शेडमध्ये नेले.

घरातील कपडे आणि गादीच्या साह्याने हे मृतदेह त्याने जाळले. दरम्यान (Kondhwa) घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सुरू आहे.

Alandi : मीडिया रिफ्लेक्शन इव्हेंटमध्ये समीरन वाळवेकरानी विद्यार्थ्यांचे केले मार्गदर्शन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.