Maval : पवना धरणातून दुपारी दीड वाजल्यापासून 9100 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार
एमपीसी न्यूज- हवामान खात्याकडून पुढील 72 तासांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मुळशी आणि पवना धरणामधून सकाळी 8 वाजता 5000 क्युसेक्स विसर्ग सूरू करण्यात आला. आता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन आज दुपारी दीड वाजल्यापासून 9100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.
मुळशी आणि पवना धरण परिसरात पावसाचा जोर ओसरल्यामुळे दोन्ही धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामध्ये मंगळवारी कपात करण्यात आली होती. मात्र हवामान खात्याकडून पुढील 72 तासांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव मुळशी आणि पवना धरणामधून सकाळी 8 वाजता 5000 क्युसेक्स विसर्ग सूरू करण्यात आला होता.
आता त्यामध्ये वाढ करण्यात येऊन आज दुपारी दीड वाजल्यापासून 9100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे अशी सूचना जलसंपदा विभागाने दिली आहे.