Pimpri: ‘त्या’ सिंधी निर्वासित लोकांना मिळाले भारताचे नागरिकत्व

एमपीसी न्यूज – काही कारणास्तव पाकिस्तान देश सोडून भारतात आलेल्या आणि येथेच स्थायिक झालेल्या सुमारे 45 सिंधी नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले.

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते त्यांना भारताचे नागरिकत्व दिले. यावेळी या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

पाकिस्तान देशातील नरकयातनांनपासून सुटका करून घेण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या सुमारे 70 सिंधी निर्वासित बांधवांना अखेर न्याय मिळाला. गेल्या 25 वर्षांपासून त्यांचे रखडलेले भारतीय नागरिकत्व त्यांना गुरुवारी  मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.