Pune : अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणी मिळणार?

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा महापालिकेत रंगली.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मात्र, पुणेकरांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी शहरातील विविध भागांतून वाढत आहेत. यंदा वरूण राजाने दमदार हजेरी लावत धरणांत 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला. 20 टीएमसी पेक्षा जास्त पाणी नदीतून सोडण्यात आले. ऑक्टोबर महिन्यापर्यंत धारण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच होता. तरीही पुणेकरांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढतच होत्या.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. आता राजकीय घडामोडी बदललेल्या आहेत. राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – काँगेसचे महाविकास आघाडी सरकार आल्याने पुणेकरांना विकासाच्या खूप अपेक्षा आहेत. पालकमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील आणि अजित पवार यांच्याच नावाची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.