Alandi : 135 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे – अजित पवार
एमपीसी न्यूज -देशातील 135 कोटी जनतेचे भवितव्य ठरवणारी ही निवडणूक ( Alandi ) आहे. राज्यातील आपल्या भागातील प्रश्न सोडवण्याची ही निवडणूक आहे, असे अजित पवार म्हणाले. काल ( दि.9 रोजी ) आळंदी येथे शिरूर लोकसभा मतदार संघ महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.