Pimpri : खरा इतिहास सांगणारे पुस्तक “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” – डॉ. ओमेंद्र रत्नू

एमपीसी न्यूज – महाराणा प्रताप यांचा खरा इतिहास जगापुढे (Pimpri)आणण्यासाठी मी “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” हे पुस्तक लिहिले आहे. महाराणा प्रताप हे हलदी घाटीचे युद्ध हरले, हा चुकीचा इतिहास आहे. महाराणा प्रताप यांनी 56 लढाया केल्या आणि सर्व जिंकल्या, जगात चीन नंतर सर्वात जास्त लांबीची भिंत आणि संगीत कलेवर पहिले पुस्तक लिहिले.

आता महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांनी दुरुस्ती करावी आणि खरा इतिहास लिहावा असे आवाहन “महाराणा प्रताप एक सहस्त्र वर्षांचं धर्मयुद्ध” या पुस्तकाचे मूळ लेखक डॉ. ओमेंद्र रत्नू यांनी केले.

Pune : बाणेरकरांनी मनमुरादपणे लुटला फॅमिली वॉकेथॉनचा आनंद; भाजपाच्या वतीने आयोजित नमो करंडकला अभूतपूर्व प्रतिसाद

लेखक डॉ. ओमेंद्र रत्नु यांनी लिहिलेल्या आणि चारूचंद्र उपासनी (Pimpri)यांनी मराठी अनुवाद केलेल्या या पुस्तकाच्या 25 व्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा शनिवारी (दि.3) आर्य समाज पिंपरी कॅम्प येथे झाला. यावेळी आर्य समाज पिंपरी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, भाजपाचे शहर अध्यक्ष शंकर जगताप, शिवशंभो विचार मंचचे प्रांत संयोजक हभप शिरीष महाराज मोरे, प्रकाशक अंकुर काळे, मराठी अनुवादक चारूचंद्र उपासनी, आर्य समाज पिंपरीचे संजय वासवानी, मुरलीधर सुंदरानी आणि हरेश तिलोकचंदानी, हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे पंडित धर्मवीर आर्य, सचिव उत्तम दंडीमे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आयोजनात उत्तम दंडीमे, सुहास पोफळे, अतुल आचार्य, दिगंबर रिद्धीवाडे आदींनी परिश्रम घेतले. स्वागत सुरेंद्र करमचंदानी, प्रस्तावना दत्ता सूर्यवंशी, सूत्र संचालन उत्तम दंडीमे, आभार सुहास पोफळे यांनी मानले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.