Pune : पोस्टरबाजीतून पाणी प्रश्नावर पालकमंत्र्यांना विचारले ‘गिरीश काय रे……. ?’

एमपीसी न्यूज- पुणेकर नागरिकांना मागील काही महिन्यापासून पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. या प्रश्नावर आता पुण्यातील काही भागात पोस्टर झळकू लागले आहेत. या पोस्टरबाजीतून पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

गिरीश काय रे ? दुष्काळ असताना देखील अजितने कधी पाणी कमी पडू दिले नाही ! तू तर आपल्या शहरातला ना ? पाणी कुठं मुरतय? एक त्रस्त पुणेकर अशा आशयाच्या फलकाने पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता या पोस्टरबाजीवर पालकमंत्री काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.