Pune : सोळावे महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन संपन्न

एमपीसी न्यूज – आयोजित सोळाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य (Pune)संमेलनाची सुरुवात करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संमेलनाचे आयोजन कै.बाळासाहेब यादव साहित्य नगरीत करण्यात आले.

यावेळी सुनिल तात्या धिवार, स्वप्नाली होले, अशोक बापू यादव, शरद यादव यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथादिंडीने खानवडी गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली.संमेलनाचे उद्घाटन बाबाराजे जाधवराव, संमेलनाध्यक्षा ज्येष्ठ कवियत्री डॉ.स्वाती शिंदे पवार

यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. (Pune)प्रमुख उपस्थिती मध्ये संमेलनाचे स्वागताध्यक्ष ह.भ.प.जगदीश उंद्रे महाराज, विजयराव कोलते, दशरथ यादव ,नितीन भागवत, संजय सोनवणे, दीपक भोंगळे, दीपक पवार ,प्रा गंगाधर जाधव, रविंद्र फुले हे उपस्थित होते.

ज्योतिबाची पोरं गाती या गीतांचे ध्वनिफीतचे प्रक्षेपण यावेळी करण्यात आले. या गीतांचे गीतकार लोककवी सिनेअभिनेते सीताराम नरके यांच्या गीताने रसिक मंत्रमुग्ध झाले.

विविध वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या कार्याची दखल घेवून त्यांना सन्मानित केले.

दुपारच्या सत्रात क्रांतिसूर्य महात्मा फुले या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे अध्यक्ष पुरुषोत्तम निकते, प्रमुख पाहुणे लोककवी सीताराम नरके ,डॉ बी डी गायकवाड, प्रा विनय कुलकर्णी, योगिता कोकरे यांनी सहभाग घेतला.

तिसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कविसंमेलनाच्या अध्यक्षा कवियत्री शशी डंबारे यांनी भूषविले.

Pimple Gurav : किरकोळ कारणावरून महिलेला आई व मुलाकडून मारहाण

प्रमुख पाहुणे अरूण कांबळे, स्वाती बंगाळे कवी डॉ.लक्ष्मण हेंबाडे मंगळवेढा यांना यावर्षीचा महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार तसेच लोककवी डॉ. मदन देगावकर बार्शी यांना महात्मा फुले काव्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ.मधुकर हुजरे धाराशिव, देवेंद्र गावंडे , पूजा माळी , मुस्कान काझी ,तानाजी जगताप , डॉ बळीराम ओहोळ, ॲड कैलास बेलेकर, शांतीलाल ननावरे बारामती, संजय सिंगलवार अमरावती, छगन वाघचौरे पुणे ,चंद्रशेखर नाझरीकर सासवड, शिवाजी झुरुंगे बारामती ,अमर सिंग राजे कागल ,पांडुरंग म्हस्के ,चंद्रकांत चाबुकस्वार दौंड ,रविंद्र ठोकळ सांगोला ,प्रा मधुकर कोथंमिरे ,रमाकांत पडवळ , संजय भोरे ,जयद्रथ आखाडे भास्कर भोसले , प्रा अशोक शिंदे , डॉ .जनार्दन वाघमारे आदी उपस्थित होते.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन रानकवी जगदीप वनशिव यांनी आपल्या शीघ्रकाव्यातून रसाळ वाणीने केले.सर्व साहित्यिकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .कार्यक्रमाचा समारोप कवी राजाभाऊ जगताप यांनी केला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.