Raj Thackeray : राज ठाकरे यांना परळी न्यायालयाकडून 500 रुपये दंड, अटक वॉरंट रद्द

एमपीसी न्यूज : चिथावणीखोर वक्तव्य आणि मनसे कार्यकर्तांनी केलेल्या दगडफेक प्रकरणी परळी न्यायालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात (Raj Thackeray) अटक वॉरंट जारी केला होता. त्यानुसार आज राज ठाकरे न्यायालयात हजर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी आता न्यायालयाने त्यांचाविरोधातील अटक वॉरंट रद्द केला असून त्यांना 500 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच पुढील सुनावणी 23 जानेवारी रोजी होणार आहे.

यांसदर्भात बोलताना राज ठाकरेंचे वकील म्हणाले, ”वैद्यकीय कारणांमुळेच राज ठाकरे न्यायालयात हजर राहू शकले नाही, हे आम्ही आज न्यायायलापुढे मांडले. न्यालयाने हे मान्य केलं असून अटक त्यांच्याविरोधातील वॉरंट रद्द केला आहे. तसेच याप्रकरणी 23 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणारा आहे.”

Pimple Saudagar News : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याचा नाना काटे यांच्या हस्ते सत्कार

2008 साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते. ठिकठिकाणी तोडफोडीचे प्रकारही घडले. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर एसटीवर दगडफेक करण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. (Raj Thackeray) या घटनेनंतर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी परळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र, सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.