Pimpri : भक्तीमय वातावरणात शहरवासीयांचा तुकोबारायांच्या पालखीला निरोप

एमपीसी न्यूज – “ज्ञानोबा-तुकाराम’चा अखंड जयघोषात” उत्साही व भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज (बुधवारी) सकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरातून पुण्याकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्यामुळे उद्योगनगरीत वैष्णवांचा मेळा अवतरल्याचे चित्र पहायला मिळाले.

आज, बुधवारी सकाळी पाच वाजता आकुर्डीतून पालखीचे प्रस्थान झाले. पालखीच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. कपाळावर चंदन, गळ्यात तुळशीमाळ असलेले वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन निघालेल्या वारकरी महिला आणि मुखामध्ये हरिनामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात पालखी पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.