Chinchwad: राज्य गुणवंत कामगार असोसिएशन अध्यक्षपदी सुरेश केसरकर, सचिवपदी स्वानंद राजपाठक

Chinchwad: Suresh Kesarkar as State Meritorious Workers Association President, Swanand Rajpathak as Secretary या गुणवंत कामगारांना एकत्रित करुन कामगारांचे प्रश्‍न हाताळण्यासाठी राज्यस्तरीय गुणवंत कामगार असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे सुरेश केसरकर यांची निवड करण्यात आली आहे. चिंचवडचे गुणवंत कामगार स्वानंद राजपाठक यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या (महाराष्ट्र राज्य अंगीकृत संस्था) वतीने दरवर्षी राज्यातील कामगारांचा गुणवंत कामगार पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो.

या गुणवंत कामगारांना एकत्रित करुन कामगारांचे प्रश्‍न हाताळण्यासाठी राज्यस्तरीय गुणवंत कामगार असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेची आज ऑनलाईन बैठक होवून असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुरेश केसरकर तर सचिवपदी स्वानंद राजपाठक यांची नियुक्ती एकमताने करण्यात आली आहे.

असोसिएशनची कार्यकारणीही यावेळी निवडण्यात आली असून यात उपाध्यक्षपदी नरेंद्र रहाटे (चंद्रपूर), अच्युतराव माने (उस्मानाबाद), तात्यासाहेब भोसले (सोलापूर), दिलीप घोलप (मुंबई उपशहर) यांची निवड करण्यात आली आहे.

सह सचिवपदावर मुकुंद कोकणे (औरंगाबाद), खजिनदारपदावर सुहास वड्डीकर (सांगली), सह खजिनदारपदावर देवराव कोंडेकर- (गडचिरोली), यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणुन अनिल मावळे (अकोला), अरुणकुमार आठवले (अमरावती), सोपान बांगर (अहमदनगर), महादेव चक्के (कोल्हापूर), नितीन गादेवार(गोंदिया), शैलेंद्रनाथ इंगळे (जळगाव), रामेश्वर वरखडे- (जालना), केरबा डावरे- (ठाणे), भगवान पाटील- (धुळे), गुलाबराव सोनवणे (नंदुरबार), अरविंद देशमुख (नागपूर).

रत्नाकर शिंदे (नांदेड), मारुती जाधव (नाशिक), किसन शिरलेकर- (परभणी), धनंजय पाटील (पालघर), सुधीर मुंडे (बीड), सुरेश साबळे (बुलढाणा), प्रमोद नागदेवे (भंडारा), प्रभाकर कांबळे (मुंबई), अरविंद जनबदकर (यवतमाळ), संजय सुर्वे(रत्नागिरी), शरद पाटील (रायगड), काशीनाथ जनगावे (लातूर), चंद्रसेन डोंगरे (वर्धा), निलेश सोमाणी (वाशिम), शिवाजी इंगवले (सातारा), दिलीप साटम (सिंधुदुर्ग), शेख सलीमोद्दीन (हिंगोली) आदींची निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात माहिती देताना सचिव स्वानंद राजपाठक यांनी सांगितले की, जे कामगार सामाजिक, शैक्षणिक, साहित्यीक, सांस्कृतिक, कला क्रीडा, संघटना व आस्थापना आदी बाबींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतो, अशा कामगारांना कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दरवर्षी किमान 51 गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरव करते.

भविष्यात असोसिएशनच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम हाती घेतले जाणार असून त्यांचा राज्यातील कामगारांना तसेच शासनालाही उपयोग होईल असेही स्वानंद राजपाठक यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.