Defence Minister : भारताची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते.
एमपीसी न्यूज – लडाखमधील भारताची 38 हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. त्याशिवाय 1963 साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्तानने पाक व्याप्त काश्मीरमधील 5,180 चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदेशीररित्या चीनकडे सोपवला, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.
पूर्व लडाख सीमेवर चीन बरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज संसदेत बोलत होते.
सीमा प्रश्न एक जटिल मुद्दा आहे हे भारत आणि चीन दोघांनी औपचारिकरित्या मान्य केले आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे तसेच शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच या मुद्याचे निष्पक्ष, परस्पर सहमतीने समाधान निघू शकते, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
जैसा कि यह सदन अवगत है चाईना, भारत की लगभग 38,000 square km भूमि का अनधिकृत कब्जा लद्दाख में किए हुए है। इसके अलावा, 1963 में एक तथाकथित Boundary-Agreement के तहत, पाकिस्तान ने PoK की 5180 square km भारतीय जमीन अवैध रूप से चाईना को सौंप दी है: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 15, 2020
लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल जवळ दोन्ही देश सैन्याची तैनाती कमी ठेवतील असा 1993 आणि 1996 मध्ये झालेल्या करारात उल्लेख आहे.
सीमा प्रश्नी जो पर्यंत तोडगा निघत नाही, तो पर्यंत लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोलचा आदर ठेवायचा, उल्लंघन करायचे नाही असे सुद्धा करारात म्हटले असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
LAC का सम्मान करना और उसका कड़ाई से पालन किया जाना, सीमा क्षेत्रों में शांति और सद्भाव का आधार है, और इसे 1993 एवं 1996 के समझौतों में स्पष्ट रूप से स्वीकार किया गया है। जबकि हमारी armed forces इसका पूरी तरह पालन करती हैं, Chinese side की ओर से ऐसा नहीं हुआ है: रक्षा मंत्री
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) September 15, 2020