Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान क्षेत्र आळंदी ट्रस्टमध्ये विश्वस्तपदी स्थानिकांना प्राधान्य द्यावे

जिल्हा सत्र न्यायाधीशांना निवेदन

एमपीसी न्यूज : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी (Alandi) येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी आळंदी येथील सामाजिक कार्यकर्ते शिरीष कारेकर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश पुणे यांना निवेदन देऊन केली आहे.

 

Alandi : श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान क्षेत्र आळंदी ट्रस्टमध्ये विश्वस्तपदी स्थानिकांना प्राधान्य द्यावे

आळंदीत बारा महिने प्रत्येक महिन्याच्या, पंधरा दिवसाला एकादशी तसेच रविवार , गुरुवार त्याचप्रमाणे आषाढी आणि कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरतात. लाखोच्या संख्येने भाविक वारकरी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे सदर ठिकाणी येणाऱ्या अडचणी ,समस्या याविषयी स्थानिकांना जवळून माहिती असतात.अशा वेळी स्थानिक प्रतिनिधी (विश्वस्त )त्याठिकाणी पूर्ण वेळ देऊ शकतात.

ऐनवेळी निर्माण होणाऱ्या समस्या यावर तत्काळ उपाय योजना करू शकतील.व त्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळेल .महाराष्ट्रातील ईतर तीर्थक्षेत्रा प्रमाणे आपण देखील आळंदी येथील तीन जागांवर तरी स्थानिकांना प्राधान्य द्यावे.अशी या निवेदनात मागणी केली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदावर स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी आळंदीकर वैयक्तिक हेवे दावे विसरून एकत्र येतील का? जेजुरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थानिकांना विश्वस्त मंडळावर समावून घेण्यासाठी एकजुट दाखवतील का?याबाबत शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.

महाराष्ट्रातील इतर तिर्थक्षेत्रातील देवस्थान मध्ये स्थानिक प्रतिनिधी आहेत पण आळंदी (Alandi) मधील स्थानिक श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त पदासाठी कायम वंचित राहिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.