Pune : पुलवामावरून मत मागणे चुकीचे – विक्रम गोखले

एमपीसी न्यूज – देशात सध्या निवडणुका होत असून राजकीय नेत्यांकडून नेत्याकडून पुलवामावरुन मते मागणे चुकीचे आहे. सैन्याचा राजकीय वापर करु नये, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पत्रकार भवन, नवी पेठ येथे पत्रकार परिषदेत मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर  निशाणा साधला. मात्र, जर त्यांना कुणी प्रश्न विचारत असतील. तर त्यांना उत्तर द्यावी लागणारच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पाऊस पडला नाही. उष्णतेची लाट आली. तर सरकार कसे जबाबदार?, सरकार काही ढग आडवत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे खापर सरकारवर फोडणे चूक असल्याचे सांगत अप्रत्यक्षपणे त्यांनी शरद पवार यांचे देखील त्यांनी कान टोचले. पुलवामावरुन निवडणुकीत मते मागितली जात आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर विक्रम गोखले यांनी भूमिका मांडली आहे.

  • राजकीय क्षेत्रात अभिनेते प्रवेश करीत आहेत. राजकारणात देखील प्रशिक्षणाची गरज आहे का? या प्रश्नावर विक्रम गोखले म्हणाले की, राजकारणासाठी प्रशिक्षण गरजेचे असून अमिताभ बच्चन हे देखील काही काळ राजकारणात घालवला आहे. याबाबत त्यांना काही काळानंतर पश्चाताप झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, मलाही अनेक राजकीय पक्षांनी बोलवले. पण, मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नसून मी सैन्य, शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकाला कायम बांधील असल्याचे त्यांनी सांगितले.

  • त्याचबरोबर राजकारण व्यवसाय-धंदा झाला आहे. ज्या तरुणांना संविधान माहीत नाही. असे तरुण नेत्यांच्या मागे फिरतात. मात्र, त्यांनी हे लक्षात ठेवावे की तरुण लाठ्या-काठ्या खातात. तर नेते घरी राहतात, अशा शब्दात राजकीय नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले.

अभिनय क्षेत्रात एवढी वर्षे काम केल्यावर आता तुम्ही आत्मचरित्र लिहणार का? त्यावर ते म्हणाले की, मी आत्मचरित्र लिहणार नसून सर्व आत्मचरित्र खोटी असतात. मी फालतू आहे. त्यामुळे आत्मचरित्र लिहणार नाही. मी एवढा मोठा नाही. माझ्यापेक्षा अनेक मोठे व्यक्ति आहेत, असे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.