Pune : महात्मा गांधींच्या ‘लोककल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेचे देशास विस्मरण – रमेश चेन्नीथला

एमपीसी न्यूज – मेरा जीवन_मेरा संदेश… या ध्येय वाक्यात बापूंची अपेक्षीत आदर्श (Pune) जीवनाची संकल्पना होती. ज्यामागे सत्य, अहिंसा, मानवता, न्याय व समानतेची पंचतत्वे व भारतीय स्वातंत्र्या मागील ‘लोकशाहीची मूल्ये’ दडलेली होती. ज्यायोगे ‘लोककल्याणकारी राज्या’ची महात्मा गांधींची संकल्पना होती, त्याचेच आज सत्ताधीशांना विस्मरण झाल्याचे देशातील परिस्थिती सांगते आहे, मात्र तरी देखील राम राज्याची भलावण केली जाते, असे प्रतीपादन काँग्रेस जेष्ठनेते, केरळचे माजी उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले.

“मला समजलेले ‘बापू’… विषयावरील निबंध स्पर्धच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले होते.
“राजीव गांधी स्मारक समिती व पुणे शहर माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ” यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित, इ. ८ वी ते १० वी (माध्यमिक शाळांमधील) विद्यार्थ्यांकरीता, “मला समजलेले बापू अर्थात महात्मा गांघी” विषयावरील निबंध स्पर्धां आयोजीत केली होती, त्याचे पारितोषिक वितरण समारंभ रमेश चेन्नीथला यांचे हस्ते संपन्न झाले. राजीव गांधी स्मारक समिती अघ्यक्ष गोपाळ तिवारी, पुणे मुख्याध्यापक संघाचे अघ्यक्ष सुजीत जगताप, समिती सदस्य यांनी मान्यवरांचे स्मृती चिन्ह, शाल व पुस्तकांचा संच देऊन स्वागत सत्कार केला.

यावेळी विध्यार्थ्यांना व पालकांना संबोधन करताना नाना पटोले यांनी सांगितले की, गांधी ही मजबुरी नसून मजबुती आहे. गांधी विचार विध्यार्थ्यांमध्ये किती प्रभावीपणे रुजला आहे, याची विजेत्या विध्यार्थ्यांचे निबंध वाचून प्रचिती आली. तसेच या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आयोजक राजीव गांधी स्मारक समिती आणि शिक्षकांचे आभार व्यक्त केले.

विधीमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महात्मा गांधींवर निबंध लिहीणाऱ्या विद्यार्थ्यांचे (Pune) कौतुक केले. निवडक निबंधातील बापूं वरील काव्य वाचन केले. बापूं’ना ‘राष्ट्रपिता’ पदवी ही सुभाष बाबूंनीच् दिल्याचे ९ वी च्या विद्यार्थ्याने निबंधात सांगणे हे सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधीमध्ये मतभेद दर्शवणाऱ्या प्रवृत्तींना चपराक असल्याचे त्यांनी सांगीतले.

महात्मा गांधीवरील निबंध स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाची व राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाल्याचे जाणवले तसेच शाळांच्या प्रशासनाकडुन ही ‘स्मारक समिती सदस्यांना’ सन्मान व सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे स्पर्धेचे संयोजक व निमंत्रक गोपाळ तिवारी यांनी सांगितले. आपल्या स्वागत प्रस्ताविकात, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्य लढ्याचा ईतिहास, स्वातंत्र्या करीता शहीद झालेल्यांचे योगदान व ‘स्वतंत्र – भारताची’ ऊभारणी इ बाबत विद्यार्थ्यांना “निबंध स्पर्धेच्या माध्यमातुन अंतर्मुख करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

महात्मा गांधींनी अधोरेखीत केलेली ११ व्रते व ७ समाजिक पापें हाच ‘आदर्श जीवनाचा’ नैतिक पाया असल्याचे सांगुन ‘सिध्दांत बिना राजनिती’ आणी ‘कर्म बिना घन’ (कष्टा विना पैसा) ही सामाजिक पापें आजच्या लोकशाही व्यवस्थेत अडगळीत पडल्याचे पहायला मिळते. शिक्षक संधाचे विजय कचरे व सचिन दुर्गाडे यांनी सुत्रसंचालन केले, नुमविच्या नलावडे यांनी आभार मानले.

स्पर्धेस सक्रीय सहकार्य करणाऱ्या, आर्थिक योगदान देणाऱ्या व रोख पारितोषिके पुरस्कृत करणाऱ्या, अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप (इ १० वी), सुभाषशेठ थोरवे (इ ९वी), भोलाशेठ वांजळे (इ ८वी) यांचेसह, धनंजय भिलारे, स्वप्नील जगताप तसेच प्रमुख परीक्षक मंडळाचे प्रमुख व बाल साहीत्यीक प्रा. डॅा दिलीप गरूड (कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक), तसेच गांधी विचारांचे अभ्यासक रमाकांत पाठक, नानगुडे (मॅाडर्न हायस्कुल), माधवी कुलकर्णी(आपटे प्रशाला), नलावडे व तारू (नुमवि), प्रा सुरज कुलकर्णी(आनंद आश्रम शाळा), वाजेदा मुलाणी (रावसाहेब पटवर्धन प्रशाला), कल्पना शेरे, प्रा संदिपान पवार(आण्णा साहेब मगर विद्यालय) इ परीक्षकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी राज्याचे माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, महाराष्ट्राचे सह प्रभारी आशीष दुआ, गटनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, संजय राठोड, प्रदेश सचिव, रामविजय बुरुंगळे, पुणे शहर अघ्यक्ष अरविंद शिंदे, शारदा गोपाळ तिवारी, रामचंद्र (भाऊ) शेडगे, आबा तरवडे, नंदू शेठ पापळ, विकास दवे, ॲड संदिप ताम्हणकर, ॲड फैयाझ शेख, हरीदास अडसूळ, गणेश शिंदे, गोरख पळसकर, संजय अभंग, गणेश मोरे, आशिष गुंजाळ, नरेश मते, महेश अंबिके, राजेश सुतार, प्रविण पेटकर इ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.