Wakad crime News : उसन्या पैशांवरुन एकाचे अपहरण करुन खून; मृतदेह पुरला

फिर्यादी यांचा मुलगा संतोष यांनी आरोपी गणेश याच्याकडून व्यवसायासाठी पैसे घेतले होते.

एमपीसी न्यूज – व्यवसायासाठी घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून एकाचे रहाटणी येथून अपहरण करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित मृतदेह कासारसाई येथे पुरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (बुधवारी, दि. 2) उघडकीस आला आहे.

याबाबत 2 सप्टेंबरला सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर त्यामध्ये कलमवाढ करून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

संतोष शेषराव अंगरख (वय 42, रा. पोलीस कॉलनी, रहाटणी) असे अपहरण आणि खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी शेषराव रंगनाथ अंगरख (वय 63) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी गणेश सुभेदार पवार आणि त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा संतोष यांनी आरोपी गणेश याच्याकडून व्यवसायासाठी पैसे घेतले होते.

घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून गणेश आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून संतोष यांचे 16 ऑगस्ट रोजी रहाटणी येथून खून करण्याच्या उद्देशाने अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अपहरण केल्यानंतर आरोपींनी संतोष यांचा खून केला. खून करून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने संतोष यांचा मृतदेह कासारसाई येथे पुरला. हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.