Pimpri : रस्त्यावर विनाकारण डांबरीकरण… कशासाठी? काँग्रेसचा सवाल
धायगुडे यांनी म्हटले आहे की, रस्ता अतिशय चांगला असताना देखील (Pimpri)डांबरीकरण का केलं जात आहे? याबाबत ठेकेदाराला विचारलं असता, तो म्हणाला आम्हाला माहिती नाही. आम्हाला पालिकेच्या साहेबांनी इथं रस्ता करायला सांगितले आहे.
जनतेच्या कष्टाचा पैसा दरोडा घालुन लुटला जात आहे, वाया घालवला जात आहे. त्याच्याबद्दल त्यांना जाणीव करून दिली असता, त्यांनी ठेकेदाराला फोन करून काम बंद करण्यास सांगितलं. एकदा चांगल्या दर्जाचा रस्ता तयार केला तर त्याला 10-15 वर्ष काहीच होत नाही. भ्रष्टाचार करून निकृष्ठ व सुमार दर्जाची कामं करून, राजरोस जनतेच्या पैशांची लुट केली जात आहे. त्या त्या प्रभागातील तथाकथित लोकप्रतिनिधींना हे जर दिसत नसेल, तर जनतेने येणा-या निवडणूकीत, त्यांचा योग्य तो सन्मान करायलाच पाहिजे. पालिका प्रशासनाला जर आमच्या पैशांची अशीच उधळपट्टी करायची असेल, तर मग कर भरणे ऐच्छिक करावे, असेही ते म्हणाले.