Pimpri : कोेकणी युवकांनी शिक्षणाबरोबर उद्योग व्यवसायात प्रगती करावी- अशोक कदम

कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज- कोकणी युवकांनी आता उच्च शिक्षणाकडे आपले ध्येय केंद्रित करावे परंतु त्याच बरोबर नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती करावी. असे मत कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचे अध्यक्ष अशोक कदम यांनी मांडले. अठरागांव संस्थेच्या मेळाव्यात बोलत होते.

कोकण खेड तालुका अठरागांव संस्थेचा स्नेहमेळावा नुकताच पिंपरीच्या आचार्य अत्रे सभागृहात उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव अनंत कदम, पशुसंवर्धन खात्याचे उपसंचालक देवेंद्र जाधव, सुरेश जाधव, पांडुरंग कदम, कॅप्टन श्रीपत कदम, मनोहर यादव, वैजयंती कदम, राजेश्री यादव तसेच संस्थेच पदाधिकारी व कोेकण खेड तालुका अठरागांवचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

यावेळी कदम म्हणाले, “कोकणी युवकांने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. आज कोकणात देखील उच्च शिक्षणाच्या अनेक सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. कोकणातील युवक उच्च पदापर्यंत पोहचला आहे. याचे अभिमान वाटते. त्यांचीच प्रेरणा घेऊन आजच्या पीढीने शिक्षणात प्रगती करावी. तसेच शिक्षणाबरोबरच उद्योगामध्ये देखील आपली प्रगती करावी” असे मत त्यांनी यावेळी मांडले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक अनंत कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप जंगम व रेश्मा चव्हाण यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.