Pune : भाडे के टट्टू चेतक को नही हरा सकते’ ; भाजपच्या सायबर योध्यांना अमित शहाचा कानमंत्र

 
एमपीसी न्यूज – अनेक लोक मला सांगतात की, सध्या राहूल गांधींची पॉवर वाढली आहे. पण मला याची काहीच चिंता नाही कारण ‘भाडे के टट्टू चेतक को नही हरा सकते’, असे  सांगत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं यांच्यावर टिका केली. 
 
पुणे शहरात आज (दि.7) भाजपच्या सोशल मीडिया प्रतिनिधींचा मेळावा पार पडला. यावेळी शहा यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण केले. यावेळी शहा यांनी विरोधकांच्या टीकेला चोख उत्तर देण्याची सूचना आपल्या सायबर योध्यांना केली. 

 
शहा म्हणाले, मला माहित आहे माझ्याकडे चेतक घोडे आहेत ज्यांना भाड्यांच्या टट्टूपासून कुठलाही धोका नाही. पण त्याअगोदर आपण योजनाबध्दरित्या काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुमच्यामध्ये असणारी निराशा काढून टाका, कुठले प्रश्न असतील तर ते ही काढून टाका, कारण आपले सरकार हे नेहमीच चांगले काम करते. 
 
केंद्रात आणि राज्यात आपल्या सरकारला चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल असं कुठलही काम केलेले नाही. याऊलट राहुल गांधींना जनताच मानत नाही, त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकारच उरला नाही. या शब्दात अमित शहा यांनी राहुल गांधीवर टिका केली.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.