Pune : पाणी उकळून प्या;पालिका प्रशासनाचे आवाहन

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणातील पाण्याचा साठा कमी झाला असल्यामुळे पाण्याला मातकट वास येत आहे. या पाण्यावर महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रीया करण्यात आली असून त्यानंतरच हे पाणी वितरीत करण्यात येत आहे. प्रक्रिया केलेले हे पाणी पिण्यासाठी पुर्णपणे योग्य आहे. गरज भासल्यास नागरिकांनी पाणी उकऴून घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.