Alandi : भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला

एमपीसी न्यूज – भांडणे मिटवण्यासाठी गेलेल्या दोघांना तीन ते चार जणांनी मारहाण केली आहे. तर एकवार हत्याराने वार करत जीवघेणा हल्ला केला आहे.ही घटना बुधवारी (दि.30) आळंदी (Alandi) येथे घडली.

Chikhali : पीएमपी बस खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

या प्रकरणी शिवतेज ज्ञानेश्वर ठाकरे (वय 23 रा.डूडूळगव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हरिओम पांचाळ अर्जुन सूर्यवंशी व त्यांचे दोन साथीदार यांच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी व फिर्यादी यांच्यात बुधवारी दुपारी भांडण झाले होते. यावेळी फिर्यादी यांनी भांडणे मिटवून घेऊ असे फोनवर सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी व त्यांचा मित्र ज्ञानेश्वर शिंदे हे दोघेजण आरोपी यांना भेटायला गेले. यावेळी आरोपींनी तुला जिवंत सोडत नाही म्हणत लोखंडी रॉडने फिर्यादीला मारहाण केली तसेच फिर्यादी खाली पडले असता त्यांच्या डोक्यात पाठीमागून लोखंडी हत्याराने मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी फिर्यादी यांचे मित्र शिंदे यांना देखील आरोपींनी दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण करत जखमी केलं. आरोपींनी फिर्यादीला पोलिसात तक्रार दिली तर तुझा खून करू,आम्ही या भागातले भाई आहोत अशी धमकी दिली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.