Mumbai : राष्ट्रवादीला राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण; उद्या रात्री साठेआठ वाजेपर्यंत मुदत

एमपीसी न्यूज – राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले असून उद्या रात्री साठेआठ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर मित्र पक्षांसोबत चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेऊ, असे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले आहे. 

राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची आता शरद पवार यांच्या घरी बैठक होणार आहे. तर उद्या राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

आज दिवसभरात घडलेल्या या राजकीय नाट्यात शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र दिसत असून शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.